skip to main |
skip to sidebar
आठवणी!!!!!!!!!!!
परत एकदा College la जायच ठरवलं...आपल्याच त्या कट्ट्यावर परत एकदा रमायचं ठरवलं..बघायच होत तो कितीसा आपला राहीलायं..तसं धाडस नव्हत होणार त्याला दुसर्यांसोबत रमताना बघायचं..पण मग एकदा अट्टहासाने गेलेच..पाहीलं तर सगळ बदललेलं..तिथे तर फ़क्त अनोळखी माणसांची गर्दी..आणि पसरलेल्या माझ्या आठवणींच्या सावल्या.त्यातच आपल्या माणसाचा शोध घ्यायचा मनाचा नेहमीचाच खेळ..:::::"नेहमीप्रमाणे मी एकटीच कट्ट्यावर लवकर आलेली..त्याची वाट बघायला लागणार म्हणुन वॆतागलेली..आणि परत एकदा त्याच विचारात गढलेली..कितीही ठरवल त्याला एकदातरी वाट बघायला लावायची तरीही कशी काय येते मी घड्याळाच्या काट्याआधीच..त्यात त्याचा तो दोष काय????परत एकदा तोच निरर्थक प्रश्न...वेळेआधी येऊन स्व:तच त्याच्यावर चिडायचं..मग स्व:तला इकडे-तिकडे रमवण्याचा प्रयत्न...येतो तो नेहमीप्रमाणे एक-दोन तास उशीरा..आल्यावर अगदी ठरल्याप्रमाणे देतोही कारणे उशीरा आल्याची..आणि परत एकदा वेडे ठरवतो आपल्यालाचं...त्याच्यावरचा राग तो आल्यावर कुठे जातो हे आजपर्यंत नाही कळल..:::::विचारात इतकी गुंग झाले...वास्तवाच भानच नाही राहीलं...अन अचानक उमगलं...आज कितीही वाट पाहिली तरी कुणीही येणारं नाहीए..उशीरा येऊन वेळ न पाळल्याची कारण देणार नाहीए..नेहमीप्रमाणेच रुसलेल्या माझा रुसवा घालवणार नाहीए..::आज अस वाटत...कारण देण्यासाठी का होइना..कोणीतरी यावं...त्यासाठी मग किती वाट पहायची माझी तयारी आहे..............
No comments:
Post a Comment