
वेड्या लोकांची वेडी ही भाषा..
ना शब्दांचं बंधन..ना व्याकरणाच्या सीमारेषा....!!!!
भाषेला ह्या काय बरं नाव????
कविता म्हणू की मनातल्या भावनांचा ठावं....!!!!
कविता आणि मनं वेगळे थोडीच असतात...
एकमेकांच्या संगतीत दोघेही बहरतात....!!!!
कवितेच्या ओळी जणू सागरलहरी....
असंख्य भावना मनपटलावर विहरी......!!!!
मनावर जेव्हा भावनांचा रंग चढे...
कवितेलाही मग सुंदर स्वप्न पडे...!!!!
स्वप्नांच्या गावा न लागे कोणाचीही साथ....
मन कविता फ़िरे हाती घालुन हात......!!!!
No comments:
Post a Comment